तलासरी तालुका पालघर जिल्हयातील 8 तालुक्यांपैकी बहुतांशी (90.73) टक्के आदिवासी बहुल तालुका आहे. तालुका केंद्र शासीत प्रदेश दादरा नगर हवेली व गुजरात राज्य यांच्या सिमा भागेवर वसलेला आहे. तालुक्याच्या मध्य भागातुन मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-8 जात आहे. तालुक्याचे 2011 च्या जनगणनेनुसार एकुण 154818 लोकसंख्या आहे. त्यापैकी 76417 पुरुष व 78401 स्त्रियांचे प्रमाण आहे. तालुक्यात झरी,तलासरी अशी दोन महसुल मंडळे असुन, एकुण 13 तलाठी सजा आहेत.
तालुक्याचे भौगोलीक क्षेत्रफळ 26711 हेक्टर आहे. तालुक्यात तालुका मुख्यालयी तलासरी नगरपंचायत कार्यरत असुन 21 ग्रामपंचायती व 41 महसुल गावे व 214 पाडे आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे एकुण 5 गट व पंचायत समितीचे 10 गण आहेत.
तालुक्यात वारली, धोडीया,कोकणा, कातकरी, जमाती प्रामुख्याने आढळुन येते यामध्ये वारली समाजीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. या तलासरी तालुक्यामध्ये धोडीया,वारली, कोकणी भाषा बोलली जाते. तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असुन, प्रामुख्याने भात हे मुख्य पीक असून हे पीक पावसावर अवलंबुन आहे. तलासरी तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालय सेवाभावी संस्था शैक्षणिक संस्था,बँक,पोस्ट, पोलीस स्टेशन, इत्यादी सोयी सुवीधा आहेत.
तलासरी तालुक्यातील झाई समुद्र किनारा, करंजगाव येथील कुंड, कुर्झे येथील धरण (दापचरी डॅम) प्रसिद्ध आहेत.
सांस्कृतिक वारसा
तालुक्यात वारली, धोडीया,कोकणा, कातकरी, जमाती प्रामुख्याने आढळुन येते यामध्ये वारली समाजीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. या तलासरी तालुक्यामध्ये धोडीया,वारली, कोकणी भाषा बोलली जाते. यामध्ये उपलाट गटामध्ये डावर,वारली झाई गटामध्ये कोकणी, धोडीया,भाषा प्रामुख्याने बोलली जाते. वारली कलाचित्र हे तालूक्यात लोकप्रिय व प्रचलित आहे. तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. पर्यटन नकाशावर तलासरी तालुक्यातील झाई समुद्र किनारा, करंजगाव येथील कुंड, कुर्झे येथील धरण(दापचरी डॅम) प्रसिद्ध आहेत.
मतदार संघ
पालघर 22-लोकसभा मतदार संघ हा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघापैकी एक आहे. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे.
मतदार संघ
पालघर जिल्हयातील 6 विधानसभा मतदार संघापैकी 128 डहाणु विधानसभा (अ.ज.) मतदार संघ एक आहे. त्यामध्ये डहाणु व तलासरी मिळुन एक मतदार संघ आहे.
भौगोलिक माहीती-
भौगोलीक क्षेत्रफळ- 267.18 चौ.किमी.
हवामान-गरम आणि दमट
लोकसंख्या-154818
लगतचे तालुके-डहाणु, वापी,उमंरगांव,सिल्वासा, इत्यादी
तलासरी तालुक्यास झाई हा हे सुंदर गाव वसलेले आहे व त्यागावास समुद्र किनारा लाभलेला आहे.
तलासरी मुख्यालयापासुन मुंबईचे अंतर सूमारे 180 किमी आहे.