बंद

जव्हार तहसील

जव्हार गाव हे शहरी  असून सन 1918 मध्ये जव्हार नगरपरिषद अस्तित्वात आली. तालुक्याचा बहुतेक भाग हा सह्याद्रीचे पठाराचा भाग असून सर्वत्र डोंगर टेकडया व लहान मोठया नदयांनी व्यापलेला आहे. जव्हार तालुका हा पालघर जिल्हयाच्या पुर्वेला असून जव्हार तालुक्याचे ठिकाण पालघर पासून 70 कि.मि.अंतरावर आहे. जव्हार तालुक्याचे पूर्वेला मोखाडा तालुका, पश्चिमेला डहाणू, दक्षिणेस वाडा तालुका व उत्तरेस तलासरी तालुका व गुजरात राज्याची सीमा आहे. जव्हार तालुक्याची बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. या तालुक्याचा बहुतेक भाग जंगलव्याप्त डोंगराळ द-याखो-याचा आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 85806 हेक्टर त्यापैकी साधारणत: भात, नागली, वरई ही प्रमुख पीके असून त्याच बरोबर तुर, उडीद व खुरासणी इत्यादी पिके घेतली जातात. तसेच पुरक शेती म्हणून मोगरा लावगवड, फुलशेती, वांगी, मिरची, टोमेटो, काजू, आंबा व तुती यांची लागवड केली जाते.तालुक्यातील सरासरी 2500 ते 3000 मी.मी. इतके पर्जन्यमान असून तालुक्याची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणना नुसार 1,40,187 आहे. जव्हार तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण 57.42 % आहे.  वाडा तालुक्यात एकुण 3 महसूल मंडळे असून त्यात जव्हार, जामसर, साखरशेत या मंडळाचा सामावेश आहे.

तालुक्याचे ठिकाण जव्हार असून ते समुद्र सपाटी पासुन 1600 फुट उंचावर वसलेले आहे. या तालुक्यात 2 ग्रामदान मंडळ व  48 ग्रामपंचायती असून 109 महसुल गावे आहेत. त्यामध्ये 1 ओसाड गाव आहे.

तालुक्यामध्ये खडखड धरण व जव्हार संस्थानचे राजे यांनी स्वखर्चाने उभारलेले जयसागर धरण आहे.  जयसागर व खडखड धरणामधुन जव्हार शहरास व आजुबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा, डोंमविहीरा ही पर्यटन स्थळे प्रसिध्द आहेत. जव्हार तालुका प्रामुख्याने धबधब्यांचा तालुका म्हणून नावारुपास आला असून कोकणातील महाबळेश्वर म्हणूनही तालुक्याची ओळख कायम आहे.

image   image

जव्हार संस्थान हे स्वातंत्र्यापूर्वी मुंबई इलाख्यातील एकमेव संस्थान होते. जव्हार संस्थानचे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे होते, त्यामुळे बोलीभाषेत महादेव कोळ्यांचे साम्राज्य – जयहर असे पण म्हणले जाते. या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते. जव्हार तालुक्यात मुकणे घराण्याचा राजवाडा आजहि दिमाखात उभा आहे.

ja

जव्हार तालुक्यातील बाळकापरा व देवतळी जामसर येथे महाशिवरात्री च्या दिवशी यात्रा भरत असते, त्यानिमित्ताने मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात.‍  तसेच छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी जव्हार मार्गे जात असताना भेट दिलेले शिरपामाळ हे ठिकाण आजही मानाचे स्थान आहे.

image

जव्हार तालुक्यात आदिवासी लोकसंख्या आहे. वारली चित्रकला व तारपा नृत्य ही तालुक्याची सांस्कृतिक ओळख आहे.

image

जव्हार संस्थान हे इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संस्थान मुंबई इलाख्यात विलीन झाले जव्हार संस्थान हे ठाणे क्षेत्रातील हे एकमेव संस्थान होते. जव्हार संस्थानचे राजघराणे हे महादेव कोळी समाजाचे होते, त्यामुळे बोलीभाषेत महादेव कोळ्यांचे साम्राज्य – जयहर असे पण म्हणले जाते. या संस्थानचे शेवटचे राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे हे होते.

छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया 1 डिसेंबर 1661ला जव्हारचे नरेश पहिले विक्रमशहा यांना भेटावयास आले.विक्रमशहा यांनी जव्हारच्या जवळच असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला होता. येथे मोठा दरबार भरवण्यात आला होता. शिवाजी महाराज आणि विक्रमशहा यांच्यात तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. यानंतर स्वतः विक्रमशहा यांनी शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपात मानचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे आजचे शिरपामाळ होय.

सांस्कृतिक वारसा

                   जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात.

ठळक काही वैशिष्टये

  1. भारतातील सर्वात जुन्या संस्थानांपैकी एक संस्थान.
  2. ब्रिटिश भारताकडून महायुद्धात सहभाग महाराजा यशवंतराव मुकणे
  3. जगप्रसिद्ध वारली चित्रकला यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान
  4. लोकप्रिय तारपा वाद्य आणि नृत्य यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान
  5. महाराष्ट्रातील सर्वात जुने संस्थान, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध, कोकणातील थंड आणि जास्त पावसाचे ठिकाण
  6. स्वखर्चाने धरण(जयसागर डॅम) बांधलेले भारतातील संस्थान
  7. भौगोलिक माहिती
    भौगोलिक क्षेत्रफळ 620.00 चौ.किमी.
    हवामान उष्ण, थंड व सम
    लोकसंख्या 1,28,147 (2011 च्या जनगणनेनुसार)
    लगतचे तालुके व जिल्हे दक्षिण- वाडा

    पुर्व- मोखाडा

    उत्तर- दादरा नगर हवेली व तलासरी तालुका

    पश्चिम-विक्रमगड व डहाणू तालुका

जव्हार तालुक्याचे क्षेत्र 22-पालघर (अ.ज.) या लोकसभा मतदार संघात येत आहे.

लोकसभा मतदार संघ क्रमांक मतदार संघाचे नाव राखीव
22 पालघर अनुसूचित जमाती

जव्हार तालुक्याचे क्षेत्र 129-विक्रमगड (अ.ज.), या विधानसभा मतदार संघात येत आहे.

विधानसभा मतदार संघ क्रमांक मतदार संघाचे नाव राखीव
129 विक्रमगड अनुसूचित जमाती

जव्हार तालुक्याचे तहसीलदार (2014) पासून

.क्र. अधिकाऱ्याचे नाव कालावधी
पासून पर्यंत
1 श्री.अरुण विठ्ठल कनोजे 01.02.2014 31.03.2016
2 श्री.जयराज नरेंद्र सुर्यवंशी 01.04.2016 17.04.2016
3 श्री.अशोक गायकवाड 18.04.2016 18.04.2016
4 श्री.जयराज नरेंद्र सुर्यवंशी 19.04.2016 16.05.2016
5 श्री.चंद्रसेन पवार 17.05.2016 04.07.2016
6 श्री.जयराज नरेंद्र सुर्यवंशी 05.07.2016 22.08.2016
7 श्री.राहुल सारंग 23.08.2016 23.08.2016
8 श्रीम.पल्लवी टेमकर 24.08.2016 03.03.2017
9 श्री.दिनेश कुऱ्हाडे 04.03.2017 03.04.2017
10 श्रीम.पल्लवी टेमकर 04.04.2017 22.05.2017
11 श्री.दिनेश कुऱ्हाडे 23.05.2017 31.07.2017
12 श्री.संतोष रघुनाथ शिंदे 01.08.2017 02.08.2018
13 श्री.अभिजीत आडारकर 03.08.2018 31.08.2018
14 श्री.संतोष रघुनाथ शिंदे 01.09.2018 19.08.2020
15 श्री.बाळाराम आंबो भला (प्रभारी) 20.08.2020 15.10.2020
16 श्री.संतोष रघुनाथ शिंदे 16.10.2020 08.01.2021
17 श्रीम.डॉ.प्रियंका पाटील
( परि.उपजिल्हाधिकारी )
09.01.2021 04.02.2021
18 श्री.संतोष रघुनाथ शिंदे 05.02.2021 30.06.2021
19 श्री.बाळाराम आंबो भला (प्रभारी) 01.07.2021 11.08.2021
20 श्रीम.आशा तामखडे-शेंडगे 12.08.2021 16.06.2023
21 श्रीम.लता प्रभाकर धोत्रे 16.06.2023 आजतागायत

जव्हार तालुका नकाशा

image