Palghar Tehsil
- पालघर तालुका सागरी, नागरी, डोंगरी अशा भौगोलिक क्षेत्र लाभलेला तालुका आहे. तालुका अशंत: आदिवासी बहूल तालुका आहे. तालुक्याला उत्तरेस डहाणू तालुका हद्द, दक्षिणेस वसई तालुका हद्द, पूर्वस विक्रमगड व वाडा तालुका हद्द, पश्चिमेस अरबी समुद्र आहे. तालुक्याच्या मध्य भागातुन मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-8 जात आहे. तालुक्याचे 2011 च्या जनगणनेनुसार एकुण 550166 लोकसंख्या आहे. त्यापैकी 288514 पुरुष व 261652 स्त्रियांचे प्रमाण आहे. तालुक्यात पालघर, माहिम, आगरवाडी, सफाळा, दहिसर तर्फे मनोर, मनोर, लालोंडे, बोईसर, तारापूर, कोळगाव अशी दहा महसुल मंडळे असुन, एकुण 63 तलाठी सजा आहेत.
- तालुक्याचे भौगोलीक क्षेत्रफळ 102503-14-7 हेक्टर आर आहे. तालुक्यात पालघर नगरपरिषद कार्यरत असुन, 133 ग्रामपंचायती व 224 महसुल गावे आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे एकुण 17 गट व पंचायत समितीचे 34 गण आहेत.
- तालुक्यात वारली, धोडीया, कोकणा, कातकरी या आदिवासी जमाती तसेच वंजारी, कोळी, आगरी, भंडारी, इतर जाती प्रामुख्याने आढळुन येते. तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असुन, प्रामुख्याने भात हे मुख्य पीक असून हे पीक पावसावर अवलंबुन आहे. तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा मुख्यालय, शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था, बँक, पोस्ट, पोलीस स्टेशन, सेवाभावी संस्था, इत्यादी सोयी सुवीधा आहेत.
- पालघर तालुका स्वतंत्र चळवळीतील एक महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. 1942 भारत छोडो आंदोलन मध्ये पालघर स्टेशन अवघ्या 100 मीटर अंतरावर पालघर शहरातील मध्यवर्ती ठिेकाणी कै. काशिनाथ हरी पागधरे, रा. सातपाटी, कै. गोविंद गणेश ठाकूर, रा. नांदगाव, कै. रामचंद्र भिामाशंकर तिवारी, रा. पालघर, कै. महादेव चुरी, रा. मुरबे, कै. सुकुर गोविंद मोरे, रा. शिरगाव या पाच स्वातंत्र सैनिकांना ब्रिटीश पोलीस अधिकारांनी केलेल्या गोळीबारात हुत्तामे प्राप्त झाले. सदरचे ठिकाण सद्यस्थितीमध्ये हुत्तामा चौक म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षी स्वातंत्र दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट या दिवशी या पाच हुत्तामांना लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिकांतर्फे पुष्पचक्र आदरांजली देण्यात येते.
- पालघर तालुक्यातील शिरगाव, केळवे, सातपाटी, माहिम, नवापूर येथील समुद्र किनारे प्रसिध्द आहेत.भौगोलिक माहीती : भौगोलीक क्षेत्रफळ- 102503-14-7 हेक्टर आर.
शेती योग्य जमीनीचे क्षेत्रफळ- 7077.56 हे.आर.
पडीक जमीनीचे क्षेत्रफळ- 22528 हे.आर.
हवामान- गरम आणि दमट
लोकसंख्या- 550166 (सन 2011 जणगणनेनुसार)
तालुके चतुर्सिमा – उत्तर- डहाणू तालुका हद्द,
दक्षिण- वसई तालुका हद्द,
पूर्व- विक्रमगड व वाडा तालुका हद्द,
पश्चिम- अरबी समुद्र आहे.
- पालघर तालुक्यामध्ये वैतरणा, सुर्या व देर्हेजे अशा बारामाही वाहणाऱ्या नदया आहेत. तालुक्यामध्ये वांद्रे, देहर्जे व मासवण येथे धरणे आहेत. व माहिम, देवखोप, मनोर, व झांझरोळी येथे बंधारे आहेत.
- पालघर तालुक्यामध्ये तारापूर येथे केंद्र शासनाचा अणु विद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. या अणु विद्युत प्रकल्पाच्या परिसरामध्ये मोठी नागरी वस्ती असून तारापूर औद्योगिक क्षेत्र आहे.
- पालघर मुख्यालयापासुन मुंबईचे अंतर सूमारे 110 किमी आहे.
समुद्र किनारे :
केळवा समुद्रकिनारा
केळवा फोर्ट, 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे किल्ला बांधला, सुंदर आणि प्रसन्न केळवा तळ दक्षिणेकडील ओवरनंतर स्थित आहे. किल्ला पालघर तालुक्यात आहे. हा किल्ला त्यांच्या मराठा राजवटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपयोग करून घेतला. किल्ला सभोवताली अधिकाधिक विस्तीर्ण नैसर्गिक दृश्ये असून सुरुच्या झाडांनी किल्ला व्यापलेला आहे .किल्ला सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे, जो भरती आणि ओहोटी च्या वेळी आनंददायक आकर्षक अनुभव प्रदान करतो. ओहोटीच्या काळात हा उत्तम प्रकारे प्रवेशजोगी आणि दृश्यमान आहे आणि स्थानिक देशातील बोट सुविधा किल्यावर येण्यासाठी उपलब्ध आहे.
शिरगाव समुद्रकिनारा
थोडेसे ज्ञात शिरगाव समुद्रकिनारा पालघरपासून अवघ्या 7 कि.मी. अंतरावर आहे, केळवे समुद्रकाठ लागूनच आहे, फक्त उथळ अभयारण्याने विभक्त आहे.
सातपाटी समुद्रकिनारा
महाराष्ट्रातील सर्वात मोठे समुद्रकिनारे म्हणून लोकप्रिय असलेले, सातपाटी समुद्रकिनारा हे भारतातील लोकप्रिय फिशिंग हब आहे. विशेषत: शनिवार व रविवार आणि संध्याकाळच्या काळात ही गर्दी अधिक असते. मासेमारी करणारी बरीच गावे जवळपासही आहेत. सप्तपती समुद्रकिनारा मुख्य शहरापासून सुमारे 13 कि.मी. अंतरावर आहे आणि शिरगाव बीचजवळ आहे.
योजना :
अ.क्र. | योजनेचे नाव | देय लाभ |
1 | संजय गांधी निराधार अनुदान योजना | दरमहा र.रु.1500/- प्रमाणे |
2 | श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना | दरमहा र.रु.1500/- प्रमाणे |
3 | इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना | दरमहा र.रु.1500/- प्रमाणे |
4 | इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना | दरमहा र.रु.1500/- प्रमाणे |
5 | इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना | दरमहा र.रु.1500/- प्रमाणे |
6 | राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना | देय लाभ र.रु.20000/- फक्त एकवेळ |
7 | महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना |
हुत्तामा चौक
पालघर तालुका स्वतंत्र चळवळीतील एक महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. 1942 भारत छोडो आंदोलन मध्ये पालघर स्टेशन अवघ्या 100 मीटर अंतरावर पालघर शहरातील मध्यवर्ती ठिेकाणी कै. काशिनाथ हरी पागधरे, रा. सातपाटी, कै. गोविंद गणेश ठाकूर, रा. नांदगाव, कै. रामचंद्र भिामाशंकर तिवारी, रा. पालघर, कै. महादेव चुरी, रा. मुरबे, कै. सुकुर गोविंद मोरे, रा. शिरगाव या पाच स्वातंत्र सैनिकांना ब्रिटीश पोलीस अधिकारांनी केलेल्या गोळीबारात हुत्तामे प्राप्त झाले. सदरचे ठिकाण सद्यस्थितीमध्ये हुत्तामा चौक म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षी स्वातंत्र दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट या दिवशी या पाच हुत्तामांना लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिकांतर्फे पुष्पचक्र आदरांजली देण्यात येते.
तारापूर किल्ला
तारापूर किल्ले च्या आत विहिरी आणि बाघ आहे , जे शंभर वर्षान साठी विकाजी मेहर्जीना बाजीराव पेशव्याने भेट दिली होती , आणि आजही त्याच्या वारसांनकडे आहे, आणि सध्या चोरघे कुटुंबच्या ताब्यात आहे. तो पालघर तालुक्याच्या बोईसर गावात स्थित आहे. आणि याशिवाय सैन्याची खोल्या , एक चर्च ,एक डोमिनिकन मठ, आणि एक रुग्णालय आहे.1739 मध्ये चिमाजी अप्पांनच्या नेतृत्वाखाली किल्यावर मराठ्यांनी हल्ला केला. ४ सुरुंग लावत, दोन बुरुज आणि महान पडदा बनविण्यात यशस्वी झाले. किल्लाच्या आत काही कनिष्ठ इमारती होते , जे त्यांना पुरण्यात आले.आत दोन गोदामे आणि एक गार्ड खोली,याशिवाय काही कनिष्ठ इमारती आणि अनेक विहिरी उत्कृष्ट पाण्याने भरलेली होती .
कालदुर्ग किल्ला
कालदुर्ग किल्ला डोंगराळ प्रकार किल्ला आहे आणि पालघर जिल्ह्यातील, पालघर तालुक्यात स्थित आहे. ह्या किल्याची उंची सुमारे १५५० फूट आहे. पालघर मध्ये अनेक डोंगराळ किल्ले आहेत आणि कालदुर्ग त्यापैकी एक आहे. गडावर आयताकृती आहे. त्यामुळे किल्ला या आयताकृती आकार सहज एक अंतर पासून ते शोधू शकतो. असे एकही चिन्ह नाहीय जे सुचविते कि ते एक किल्ला आहे. गडावर वन झाडं मोठ्या प्रमाणावरील आहेत त्यामुळे जाती-जमाती निरोगी लोकसंख्या किल्यावर आहे.पण राहणीमान गरीब आहे. किल्ला हा आयताकृती खडक झाल्यामुळे वाटून जाते खडक वरील किल्ला आणि खडक खालील किल्ला. दोन तीन पायऱ्या आहेत जे दोन भाग वेगळे करतात.
Constituencies
- 22- पालघर (अ.ज) लोकसभा मतदार संघ हा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघापैकी एक आहे. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे.
- पालघर तालुक्यामध्ये 2 विधानसभा मतदार संघ असून, 130पालघर विधानसभा (अ.ज.) मतदार संघ व 131बोईसर विधानसभा (अ.ज.) मतदार संघ आहे.
बोईसर एमआयडीसी
तारापूर एमआयडीसी :
महत्वाचे प्रकल्प :
पालघर तालुक्यामध्ये मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, विरार डहाणू रेल्वे चौपदरीकरण, वेस्टर्न डेडीकेटेड फ्राईट कॉरीडोर (DFCC) असे महत्वाकांक्षी प्रकल्प प्रगती पथावर आहेत.
मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन